
छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत विविध राष्ट्रीय आणि राज्यातील मुद्द्यांवर भाष्य केलं. राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत बंगालमधील हिंसाचारावरही टीका करण्यात आली. तसेच बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर आणि संजय राऊत यांच्या भूमिकेवरही शिरसाट यांनी निशाणा साधला.