साताऱ्यात Rohit Pawar यांनी बारामती पोटनिवडणूक आणि देशातील निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली. बारामतीत Sunetra Pawar आघाडीवर राहतील, असा विश्वास व्यक्त करत अजित पवारांच्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये चुरशीची लढत असून मतदार यादीत नावं कमी केल्याच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. Mamata Banerjee यांची लढत कौतुकास्पद असल्याचे सांगत अंतिम निकालाची वाट पाहण्याचे आवाहन केले. तामिळनाडूमध्ये Vijay यांच्या नव्या पक्षाची कामगिरीही लक्षवेधी असल्याचे त्यांनी नमूद केले.