
भाजप आमदार राम कदम यांनी राहुल गांधींच्या CBSE विद्यार्थ्यांविषयीच्या विधानावर आणि शरद पवार गटाच्या आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील १४० कोटी जनतेच्या हिताचे रक्षण करत असून राहुल गांधींनी आधी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी, असा टोला त्यांनी लगावला. तसेच नवी मुंबईतील शरद पवार गटाचे आंदोलन हे जनतेसाठी नसून, पक्षात उरलेले कार्यकर्ते अजित पवार गटात जाण्यापासून रोखण्यासाठी आणि केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू असल्याची घणाघाती टीका राम कदम यांनी केली.