
शिवसेना UBT मध्ये फूट पडण्याच्या चर्चांदरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीत पोहोचले. यावेळी त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून कायम त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिंदे गटाकडून कोणताही संपर्क किंवा फोन आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. आपण समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.