
प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे दरवाजे नेहमी खुले असल्याचे म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास असणाऱ्या खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांचे स्वागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.