
Prasad Lad यांनी मराठा आंदोलनाचे नेते Manoj Jarange यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेत विविध मागण्यांवर चर्चा केली. मनोज जरांगे यांनी सरकारला 28 मेपर्यंतचा अल्टिमेटम देत कुणबी प्रमाणपत्र, सारथी, महामंडळ निधी, मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिंदे समिती मुदतवाढ यांसारख्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. सरकारने निर्णय न घेतल्यास 30 मेपासून उपोषण करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.