
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा, 106 हुतात्म्यांचे बलिदान, कामगारांचे योगदान आणि राज्याच्या विकासातील महाराष्ट्राची भूमिका यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. मराठी भाषेचा अभिमान ठेवत सर्वांनी मराठी शिकावी असे आवाहन करत, भाषेच्या नावावर होणाऱ्या वादांना विरोध दर्शवला. तसेच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील Missing Link प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास वेळ कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.