
मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल आणि LPG दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. वाढत्या इंधन दरांमुळे प्रवास, घरगुती खर्च आणि खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. वडा पाव, नारळ पाणी यांसारख्या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली.