
जेजुरी येथे पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या अपघातानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली. या अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चालकांची वैद्यकीय तपासणी, अनुभव, वयोमर्यादा, चालकांची अदलाबदल आणि वेग नियंत्रण यांसारख्या उपाययोजना राबवल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.