दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एआयच्या वाढत्या वापरामुळे चित्रपटसृष्टीवर येणाऱ्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होऊ शकतो कारण एआयमुळे कोणीही घरबसल्या उत्तम चित्रपट बनवू शकेल.
दीड वर्षात सिनेमा संपून जाणार, 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची चिंता ऐकून येईल प्रचंड टेन्शन
आजकाल सगळ्याच क्षेत्रांमध्ये एआयचा सर्रास वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वापरून हल्ली सर्रास काहीही बनवलं जात. भविष्यात या माध्यमातून एखादा चित्रपट बनवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
26
एआयच्या वापरामुळे सिनेमा होणार बंद
एआयच्या वापरामुळे सिनेमा बंद होऊ शकतो अशी शक्यता महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. याच्या वापरामध्ये मोठा धोका असल्याची शक्यता महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.
36
मराठीसोबत हिंदीत महेश यांनी केलं काम
महेश मांजरेकर यांनी मराठीसोबतच हिंदी भाषेत सिनेमे बनवले आहेत. ते विविध विषयांवरचे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांचा या शुक्रवारी पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येत आहे.
पुढील दीड वर्षात सिनेमा बंद पडणार असल्याचं यावेळी बोलताना महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. AI च्या मदतीने आपण घरच्या घरी चांगले सिनेमे बनवू शकतो असं म्हटले आहेत.
56
महाभारताचा ट्रेलर पहिला
मी महाभारताचा ट्रेलर पहिला असून तो डोळे दिपवणारा ट्रेलर बनला आहे. जर हे सगळं घरी बसल्या बसल्या एका क्लिकवर होणार असेल तर कशाला पैसे घालायचे? ज्या दिवशी एआय सिनेमे बनवायला सुरुवात करेल त्यादिवशी आपण संपणार.
66
अनेक लोक बनवणार सिनेमे
अनेक लोक हे भविष्यात सिनेमे बनवतील असं यावेळी बोलताना महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. त्यांची शक्यता खरी झाल्यावर भविष्यात माणसाला वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागू शकतो.