कुमकुम भाग्य मालिकेचा प्रवास संपणार, ११ वर्षांनी मालिका होणार बंद

Published : Aug 07, 2025, 02:15 PM IST
kumkum bhagya to off air after 11 years here is when last episode telecast

सार

११ वर्षे चाललेली झीटीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' मालिका टीआरपी कमी झाल्यामुळे बंद होणार आहे. चार पिढ्यांचे कुटुंब दाखवणारी ही मालिका आता 'गंगा माँ की बेटीया'ने रिप्लेस होणार आहे. चाहत्यांनी मालिका बंद करू नये म्हणून भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

२०१४ मध्ये झीटीव्हीवर सुरू झालेली मालिका ‘कुमकुम भाग्य’ आता तब्बल ११ वर्ष चालू राहिल्यानंतर बंद होणार आहे. शाबीर अहलूवाला आणि सृति झा यांच्या प्रमुख भूमिकांनी या मालिकेला सुरुवात झाली होती. या मालिकेने चार पिढ्यांचे कुटुंब दाखवण्यात आलं होत, TRP मध्ये अनेक वर्ष ही मालिका टॉप चार्ट्समध्ये राहिली, परंतु आता तिचा टीआरपी कमी होत चालला आहे.

टीआरपी कमी झाल्यामुळं घेतला निर्णय 

मालिकेत सतत होत कथा बदलत असल्यामुळे आणि नवीन कलाकारांच्या एंट्रीनंतरही TRP कमी झाला आहे. परिणामी, निर्माता आणि झीटीव्हीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः ३००० हून अधिक भागांची मालिका चार पिढ्यांच्या कुटुंबासोबत सुरु होती. नवीन कलाकारांना मालिकेमध्ये संधी देण्यात आली होती.

झीटीव्हीने ‘कुमकुम भाग्य’ आलेल्या जागी एक नवीन पारिवारिक मालिका ‘गंगा माँ की बेटीया’ ही मालिका सुरू करण्याची तयारी केली आहे. या मालिकेकडे प्रेक्षकांचे डोळे लागून राहिले आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी ही घोषणाही ऐकली आणि अनेकांनी भावनात्मक ट्वीट्स टाकले. "कृपया शो बंद करू नका", चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया ही मालिका बंद कारण्यामुळं दुःख झालं आहे.

एका युगाचा अंत

‘कुमकुम भाग्य’ हा केवळ एक टीव्ही शो नव्हे तर एक दशकभर प्रेक्षकांशी जोडलेली मालिका आहे. आता तो प्रवास आठवणींच्या भागांमध्ये बंद होणार आहे बहुतेक चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, शोच्या शेवटच्या एपिसोडनं किमान सुंदर आणि समर्पक शेवट मिळावं. त्यामुळं आता शेवटी काय होत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?