जेव्हा पण बाजारात नवी गाडी येते, तेव्हा पहिला प्रश्न असतो तो तिच्या सेफ्टी रेटिंगचा. हे रेटिंग मिळवण्यासाठी गाडीची क्रॅश टेस्ट होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की या लाखोंच्या गाड्यांचं टेस्टनंतर काय होतं?
भारतात भारत NCAP आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल NCAP सारख्या संस्था या चाचण्या घेतात. त्या एका ठराविक वेगाने नवीन गाडीला काँक्रीटच्या भिंतीवर किंवा अडथळ्यावर आदळतात. यामुळे, खऱ्या अपघातात प्रवासी किती सुरक्षित राहतील हे तपासण्यास मदत होते.
25
चाचणीवेळी काय होते?
क्रॅश टेस्ट दरम्यान, गाडी मोठ्या ताकदीने अडथळ्यावर आदळते. एअरबॅग्ज उघडतात आणि गाडीचं बोनेट, दरवाजे आणि पुढच्या भागाचं मोठं नुकसान होतं. कधीकधी हे नुकसान इतकं जास्त असतं की गाडीची संपूर्ण रचनाच वाकडी होते.
35
क्रॅश टेस्टमधील गाडी वापरतात?
क्रॅश टेस्टमध्ये वापरलेली गाडी पुन्हा कधीही विकली जात नाही किंवा रस्त्यावर चालवली जात नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तिला भंगारात (स्क्रॅपयार्ड) पाठवलं जातं. तिथे एक मोठा हायड्रॉलिक क्रशर गाडीला पूर्णपणे चपटी करतो. त्यानंतर हे मेटल रिसायकलिंगसाठी पाठवलं जातं.
टेस्टनंतर लगेचच, तज्ज्ञांची एक टीम गाडीची तपासणी करते. अपघाताच्या वेळी पॅसेंजर केबिन किती सुरक्षित राहिली, याचं ते विश्लेषण करतात. गाडीतील डमीजची (पुतळ्यांची) तपासणी करून माणसाला कोणत्या प्रकारच्या दुखापती होऊ शकतात हे ते पाहतात. सीटबेल्ट कसे काम करतात, एअरबॅग्ज किती लवकर उघडल्या, अशा प्रत्येक गोष्टीचा डेटा ते गोळा करतात.
55
कंपनीला काय फायदा?
कार कंपन्या या डेटाचा वापर करून त्यांची भविष्यातील मॉडेल्स अधिक सुरक्षित बनवतात. काही कंपन्या तर अपघातग्रस्त गाड्या कित्येक महिने अभ्यासासाठी स्वतःकडे ठेवतात. या विश्लेषणातून त्यांना आगामी गाड्यांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये सुधारण्यास मदत होते. म्हणूनच या टेस्ट केलेल्या गाड्या पुन्हा रस्त्यावर कधीच दिसत नाहीत; त्यांचं थेट भंगारात रूपांतर होतं.