Car Market: टोयोटा आपली लोकप्रिय MPV इनोव्हा क्रिस्टा डिझेल मॉडेल बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कंपनीने याबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय, ते जाणून घेऊया.
तुम्ही जर टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. टोयोटा आपली लोकप्रिय MPV इनोव्हा क्रिस्टा बंद करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. विशेषतः लांबच्या प्रवासासाठी क्रिस्टाच्या डिझेल मॉडेलवर अवलंबून असणाऱ्यांना ही बातमी ऐकून धक्का बसला होता. आगामी कठोर प्रदूषण नियमांमुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते, अशा अफवा होत्या. पण आता टोयोटाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
24
कंपनीचं म्हणणं काय?
या सर्व गोंधळात, टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) चे कंट्री हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी सत्य समोर आणलं आहे. 'ऑटो टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा त्यांना इनोव्हा क्रिस्टा बंद करण्याबद्दल आणि डिझेल इंजिनपासून दूर जाण्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, 'मला वाटतं या निव्वळ अफवा आहेत.' गुलाटी यांच्या या एका उत्तराने अनेक दिवसांपासूनच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
34
डिझेल गाड्यांना अजूनही मागणी!
विक्रम गुलाटी यांनी स्पष्ट केलं की, भारतात डिझेल कार्सना अजूनही मोठी मागणी आहे. विशेषतः जे लोक लांबचा प्रवास करतात आणि ज्यांना जास्त टॉर्क व पॉवरची गरज असते, असे ग्राहक डिझेल गाड्यांना पसंती देतात. 'आम्हाला डिझेल गाडीच हवी, असं म्हणणारे ग्राहक अजूनही बाजारात आहेत,' असं ते म्हणाले. बाजारात अनेक बदल झाले असले तरी, इनोव्हा क्रिस्टाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही आणि ते दुसरा पर्याय शोधत नाहीत, असा विश्वास टोयोटाला आहे.
डिझेल इंजिन म्हणजे जास्त प्रदूषण, असा एक सामान्य गैरसमज आहे. पण गुलाटी यांनी हा गैरसमजही दूर केला. ते म्हणाले की, BS6 प्रदूषण नियम लागू झाल्यापासून डिझेल गाड्या पेट्रोल किंवा सीएनजी गाड्यांइतक्याच स्वच्छ झाल्या आहेत. आता प्रदूषणाच्या बाबतीत सर्व इंजिन जवळपास सारखीच आहेत. शिवाय, डिझेल गाड्या उत्तम परफॉर्मन्स आणि चांगला मायलेज देतात, असंही त्यांनी नमूद केलं. टोयोटाचा मोठा प्लॅन देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी डिझेल मॉडेल्स पूर्णपणे बंद केली असताना, टोयोटाची घोषणा महत्त्वाची आहे. पण टोयोटाचा प्लॅन थोडा वेगळा आहे. कंपनी इलेक्ट्रिक कार, फ्लेक्स-फ्यूएल, हायड्रोजन टेक्नॉलॉजी अशा अनेक पर्यायांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. त्याच वेळी, त्यांना फक्त एकाच इंधनावर अवलंबून राहायचं नाही. भारताचं ऑटोमोबाईल भविष्य पूर्णपणे इलेक्ट्रिक नसेल, तर ते 'मल्टी-फ्यूएल' सिस्टीम असेल, असं गुलाटी यांनी स्पष्ट केलं. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रीड या सर्वांचं आपापलं योगदान असेल, असा कंपनीचा दृष्टिकोन आहे.