Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार अटल सेतूचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (12 जानेवारी) अटल सेतूचे लोकार्पण केले जाणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या प्रवासाचे अंतर फार कमी होणार आहे. जाणून घेऊया या सागरी सेतूबद्दलच्या काही खास गोष्टी सविस्तर....

Chanda Mandavkar | Published : Jan 12, 2024 5:15 AM IST / Updated: Jan 12 2024, 11:20 AM IST

Mumbai Trans Harbour Link : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (12 जानेवारी) देशातील सर्वाधिक मोठ्या सागरी सेतूचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL)चे उद्घाटन करणार आहेत. 

अधिकृतरित्या या सेतूला अटल बिहारी वाजपेयी शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू (Atal Bihari Vajpayee Shivadi Nhava Sheva) नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील या कार्यक्रमावेळी उपस्थितीत असणार आहेत.

अटल सेतूच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. अटल सेतू जवळजवळ 21.8 किलोमीटर रूंद आणि सहा पदरी असणारा सेतू आहे. या सेतूचा 16.6 किलोमीटरचा हिस्सा समुद्रावरुन आणि 5.5 किलोमीटरचा हिस्सा जमिनीवरुन जातो. अटल सेतूवरुन प्रतिदिन 70 हजारांहून अधिक गाड्या धावतील असा अंदाज लावण्यात येत आहे.

अटल सेतूबद्दल खास गोष्टी
अटल सेतू मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामधील अंतर कमी करेल. याशिवाय मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतापर्यंतच्या प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. याव्यतिरिक्त मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरदरम्यान कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे.

अशी अपेक्षा केली जातेय की, सेतूच्या उद्घाटनानंतर मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासादरम्यानचे अंतर फार कमी होणार आहे. सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे या दरम्यानच्या प्रवासासाठी दोन तास लागतात. पण सेतू, वाहतूकीसाठी सुरू झाल्यास मुंबई आणि नवी मुंबईतदरम्यानचा प्रवास केवळ 20 मिनिटांमध्ये होऊ शकतो.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उभारण्यासाठी जवळजवळ 177,903 मॅट्रिक टन स्टील आणि 504,253 मॅट्रिक टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.

अटल सेतूवर वाहनाचा वेग किती ठेवावा?
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर चारचाकी वाहनांसाठीचा वेग अधिकाधिक 100 किमी प्रति तास ठेवण्यात आला आहे. याशिवाय मोटरसायकल, ऑटो-रिक्षा आणि ट्रॅक्टरला या सेतूवर प्रवास करण्यास बंदी असणार आहे. कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनी बस आणि टू-एक्सल बससाठीचा वेग 100 किमी प्रति तास असणार आहे. पण सेतू चढताना आणि उतरताना वाहनाचा वेग 40 किमी प्रति तास करावा लागणार आहे.

टोल शुल्क किती असणार?
अटल सेतूवरुन प्रवास करण्यासाठी 250 रूपयांचा टोल द्यावा लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याआधी 500 रूपये टोल आकारण्याचे ठरविले होते. पण 4 जानेवारीला झालेल्या बैठकीत टोलची रक्कम कमी करण्यात आली.

आणखी वाचा : '

Mumbai Trans Harbour Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची केली पाहणी

Deep Clean Campaign : स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरू ठेवा, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून व्यक्त केला खेद, म्हणाले.…

Share this article