मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) आणि इंटरनेट यंत्रणा उभारणारे कंत्राटदार यांच्यातील वाद याला कारणीभूत ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार
कंत्राट रद्द: इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराने अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे 'एमएमआरसीएल'ने त्यांचे कंत्राट रद्द केले आहे.
कंपन्यांची माघार: आरे ते वरळी या टप्प्यात एअरटेल, व्होडाफोन आणि जिओ यांसारख्या कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध होते. मात्र, यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीने अवाजवी शुल्काची मागणी केल्यामुळे या दूरसंचार कंपन्यांनी सेवा देण्यास नकार दिला किंवा मर्यादित ठेवली.
नवा टप्पा, जुनीच अडचण: बीकेसी ते आचार्य अत्रे चौक आणि पुढे कफ परेडपर्यंतच्या विस्तारानंतर इंटरनेट सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा होती, मात्र कंत्राटदारासोबतच्या वादामुळे सध्या प्रवाशांना 'डिस्कनेक्ट' राहावे लागत आहे.