Mumbai Metro Line 11 extension: राज्य सरकारने मुंबई मेट्रो मार्गिका ११ मध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत, ज्यामुळे आता ठाणे आणि पूर्व उपनगरातील प्रवासी थेट दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास करू शकतील.
ठाणे ते थेट गेटवे ऑफ इंडिया! मुंबई मेट्रो ११ चा नवा अवतार
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिका ११ (Metro 11) मध्ये महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. आता ही मेट्रो केवळ दक्षिण मुंबईपुरती मर्यादित न राहता, उपनगरांनाही जोडणार आहे.
28
काय आहे नवा बदल?
पूर्वी वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया असा १७.५ किमीचा प्रस्तावित असलेला हा मार्ग आता २४.४ किमी इतका लांब झाला आहे. यामध्ये अतिरिक्त ६.९ किमी अंतराची भर पडली असून, स्थानकांची संख्या १५ वरून २० वर पोहोचली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २३,४८७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
38
पाच नवी स्थानके कोणती?
प्रवाशांची वाढती संख्या आणि कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन या मार्गावर पाच नवीन स्थानके जोडण्यात आली आहेत.
ही पूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गिका असेल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लाईन मेट्रो ४ (कासारवडवली ते वडाळा) ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना थेट दक्षिण मुंबई गाठता येईल.
58
असा असेल मेट्रो ११ चा संपूर्ण मार्ग
ही पूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गिका असेल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लाईन मेट्रो ४ (कासारवडवली ते वडाळा) ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना थेट दक्षिण मुंबई गाठता येईल.
68
प्रमुख स्थानके
अनिक बस डेपो, शिवडी, रे रोड, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, हॉर्निमन सर्कल आणि एसपीएम सर्कल (गेटवे ऑफ इंडिया).
78
कनेक्टिव्हिटीचा बूस्टर डोस
हा मार्ग धारावी पुनर्विकास प्रकल्पाखालून जाईल. धारावी स्थानकावर ही मेट्रो 'मेट्रो ३' ला जोडली जाईल, ज्यामुळे कुलाबा आणि सीप्झला जाणे सोपे होईल. तसेच वांद्रे पश्चिम येथे ही लाईन 'मेट्रो २बी' ला कनेक्ट होईल.
88
मुंबईकरांना होणारे फायदे
ठाणे ते दक्षिण मुंबई थेट प्रवास: कासारवडवली ते थेट गेटवे ऑफ इंडिया असा प्रवास आता विनासायास होईल.
रेल्वे टर्मिनस कनेक्टिव्हिटी: वांद्रे टर्मिनस जोडले गेल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी सोय होईल.
वेळेची बचत: मिठी नदीखालून आणि गजबजलेल्या भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट भागातून भुयारी मार्गाने प्रवास केल्यामुळे वेळेत मोठी बचत होईल.