कोकणात फिरायला जायचं असेल ते येथे नक्की जा, कोणती आहेत 'ती' ठिकाणं?

निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि हिरवाईने नटलेला कोकण प्रदेशात गणपतीपुळे, अलिबाग, मालवण, दापोली, हरीहरेश्वर, गुहागर, आंबोली, वेंगुर्ला आणि दिवेआगर ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कोकणातील पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि हिरवाईने नटलेला कोकण प्रदेश पर्यटकांसाठी स्वर्गच आहे. जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर खालील ठिकाणं नक्की भेट द्या.

१. गणपतीपुळे -  रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हा एक प्रसिध्द समुद्रकिनारा आणि धार्मिक स्थळ आहे. इथला स्वयंभू गणेश मंदिर आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण ठरतो.

२. अलिबाग - मुंबईपासून जवळ असलेला अलिबाग समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. किहीम, नागाव, आणि काशीद बीच, तसेच मुरुड-जंजिरा किल्ला येथे भेट देण्यासारखा आहे.

३. मालवण – तोंडाला पाणी सुटेल असा समुद्रकिनारा आणि सीफूड मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, आणि स्कुबा डायव्हिंगसाठी हे ठिकाण प्रसिध्द आहे. कोकणी सीफूड आणि मालवणी थाळी चाखण्यासाठी हे उत्तम स्थान आहे.

४. दापोली – मिनी महाबळेश्वर दापोली हे थंड हवेचे ठिकाण असून कर्दे समुद्रकिनारा, मुरुड बीच, आणि सुवर्णदुर्ग किल्ला हे येथे मुख्य आकर्षण आहे.

५. हरीहरेश्वर – धार्मिक स्थळ आणि समुद्रकिनारा हरीहरेश्वरला "दक्षिण काशी" असेही म्हटले जाते. येथे हरीहरेश्वर मंदिर आणि सुंदर किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

६. गुहागर – शांत, सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा गुहागरच्या स्वच्छ किनाऱ्यांसह (गुहागर बीच, वेलणेश्वर बीच) येथे गणपती मंदिर पाहण्यासारखे आहे.

७. आंबोली – कोकणचे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम स्थळ आहे. येथे आंबोली धबधबा, हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान आणि कावळेसाद पॉईंट हे पर्यटकांसाठी आकर्षण आहेत.

८. वेंगुर्ला – अप्रतिम समुद्रकिनारे आणि शांत निसर्ग वेंगुर्ला समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी उत्तम स्थान आहे.

९. दिवेआगर – सोनेरी किनारे आणि पर्यटनस्थळे दिवेआगरमध्ये सुंदर समुद्रकिनारे असून दिवेआगर गणपती मंदिर आणि निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात.

पर्यटनासाठी उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कोकणातील पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. उन्हाळ्यातही काही किनारी भाग पर्यटकांसाठी आरामदायक असतात.

Share this article