
मुंबई- प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मोठा संघटनात्मक डाव टाकत तब्बल ८१ नव्या जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. या घोषणेमुळे केवळ नेतृत्व बदलाचं संकेत मिळालं नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीची चुणूकही स्पष्ट झाली आहे.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली. यात शिरीष बोराळकर यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. त्याचबरोबर मुंबईसारख्या महानगरात अॅड. आशिष शेलार यांची भूमिका अधिक निर्णायक राहणार असल्याचेही स्पष्ट दिसते.
"संघटन मजबूत करा, मैदान लढायला सज्ज व्हा" भाजपने केलेल्या या बदलांचा स्पष्ट हेतू आहे – जिल्हास्तरावर नवचैतन्य निर्माण करून कार्यकर्त्यांचा नवा उत्साह जागवणे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना, भाजपला जिल्हास्तरावर प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. ही यादी म्हणजे 'कमकुवत कड्यांना बळकट करणं' आणि 'संघटनाची व्यूहनीती पुन्हा सजवणं' असं राजकीय जाणकारांचे मत आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी फडित भाजपचा टोकाचा डाव राज्यात एकीकडे महायुतीचं समीकरण, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व शरद पवार गटांनी आपापल्या पातळीवर ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या स्पर्धात्मक राजकारणात भाजपने जिल्हा संघटन पातळीवर आक्रमक पावलं उचलल्याने राजकीय चक्रमंडळ पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत.