विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सूचना
आज (18 ऑगस्ट) दुपारी सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांची राहील, असंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे. मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थी घरी पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय शाळा मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत.