अनेक शेतकरी जाणीवपूर्वक ॲग्रीस्टॅक नोंदणी करत नसल्याचा संशय प्रशासनाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे
जमिनीची अचूक माहिती: नोंदणी करताना जमिनीचे क्षेत्रफळ आणि प्रकाराची सविस्तर माहिती द्यावी लागते.
पात्रतेवर टांगती तलवार: ही माहिती उघड झाल्यास अनेकजण योजनेच्या निकषात बसत नसल्याचे समोर येऊ शकते.
साठेबाजीला लगाम: चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सरकारने हे डिजिटल कवच (AgriStack) अनिवार्य केले आहे.