“मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतला” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे सांगितले.
शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आणि मोसंबीचा ज्युस पाजून त्यांचे उपोषणही सोडवले.