हवामान विभागाने आज (ता. १९) नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, अमरावती, वर्धा, वाशीम, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.