Maharashtra Weather Alert: पावसाचा कहर, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'

Published : Aug 17, 2025, 09:29 PM IST

Maharashtra Weather Alert: श्रावण महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा जारी केला आहे. 

PREV
15

मुंबई : श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही भागातील शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यापैकी 5 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' आणि 11 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

25

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज अलर्ट

मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथेही 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' आहे.

35

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असल्याने 'यलो अलर्ट' आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' असून, या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यासाठी मात्र मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

45

विदर्भातही पावसाचा तडाखा

विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

55

नागरिकांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories