हवामान खात्याने २२ ऑक्टोबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस कोसळण्याचा इशारा दिला गेला आहे. यामुळे पिके घेतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.