'NDA सरकार फार काळ टिकणार नाही, विधानसभेतही पराभव अटळ' : पृथ्वीराज चव्हाण

Published : Jul 18, 2024, 06:19 PM ISTUpdated : Jul 18, 2024, 06:20 PM IST
Prithviraj Chavan

सार

Congress Prithviraj Chavan : दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

Congress Prithviraj Chavan : दिवा विझताना फडफडतो, राज्य सरकारची तशीच स्थिती आहे. आज घोषणा केलेली लाडकी बहीण योजना चांगली पण उद्या निवडणुका झाल्यावर काय? घोषणा करा पण त्याला कायद्याचा आधार द्या. योजना जाहीर करायच्या पण अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा का? राज्यावर आणखी किती कर्ज काढणार आहेत? या फक्त पोकळ घोषणा आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विशाळगड परिसरातील हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून अजित पवार पीडितांशी संवाद साधणार आहेत. हा दिखावा करणे महत्त्वाचे नाही. कृती करणे महत्त्वाचे आहे. राज्य पेटले तर त्याचा परिणाम उद्योग, नोकऱ्यांवर होईल. राज्यात सुरु असलेल जातीय ध्रुवीकरण थांबले पाहिजे. शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण स्पष्टपणे म्हणाले.

दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही

दिल्लीतील NDA सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भाजप, RSS चे धोरण आहे. आगामी विधानसभेत यांचा पराभव अटळ आहे, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. उद्योगधांद्याबाबत सरकार अधिवेशनात म्हणाले होते की, आम्ही श्वेतपत्रिका काढू. पण ती कधी काढणार त्यावर काहीच सांगत नाहीत. धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठा स्कॅम आहे, त्याचीही श्वेतपत्रिका काढू म्हणाले होते. पण ती निवडणुकीपूर्वी काढावी. या सगळ्या घोषणा मतांसाठी होत आहेत, या शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.

दरम्यान, वरिष्ठ नेत्यांसोबत आमच्या दोन बैठका आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा भाग आहे. चेहरा आणि जागावाटप यावर जाहीर चर्चा करता येणार नाही. यावर बंद खोलीत चर्चा करावी लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

आणखी वाचा :

उत्तर प्रदेशात दिब्रूगड एक्स्प्रेसचा अपघात, रेल्वेचे 10-12 डब्बे रुळावरुन घसरले

पुण्यात Zika Virusचा गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका, प्रशासन हाय अ‍ॅलर्ट मोडवर

मुंबईसह कोकण किनापट्टीत 200 ते 500 मिमी पाऊस पडणार, हवामान खात्याचा इशारा

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती