मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, राज्याचा खरा विकास गावांच्या प्रगतीवर अवलंबून आहे.
“गरीब, कामगार आणि ग्रामीण भाग समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती शक्य नाही,” असं ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत 28,000 ग्रामपंचायती आणि 40,000 गावांना आदर्श गावं बनवण्याचा संकल्प आहे.
या मोहिमेतून स्वच्छता, पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या सर्व बाबींवर काम होणार आहे.
CSR निधी, सरकारी योजना आणि लोकसहभाग याच्या जोरावर गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा मानस आहे.