Kolhapur Diwali Special Trains : कोल्हापुरकरांसाठी दिवाळी गिफ्ट, तीन विशेष रेल्वे गाड्यांद्वारे सोयीस्कर प्रवासाची सुविधा!

Published : Aug 30, 2025, 09:11 PM IST

Kolhapur Diwali Special Trains : दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूरहून तीन विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेने एकूण 40 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये कोल्हापूरहून मुंबई, कलबुर्गी आणि कटिहारसाठी गाड्यांचा समावेश आहे.

PREV
16

कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापुरकरांना मध्य रेल्वेने दिलंय एक मोठं गिफ्ट! सणासुदीच्या काळात विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेल्या असून, या वेळी कोल्हापुरातून तीन विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

26

मध्य रेल्वेकडून 40 विशेष गाड्यांची योजना

मध्य रेल्वेने यंदाच्या दिवाळीच्या सणासाठी एकूण 40 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीन गाड्या कोल्हापूरहून सुरू होणार आहेत, ज्यामुळे कोल्हापुरकरांना मुंबई, कलबुर्गी, आणि कटिहार अशा विविध ठिकाणी सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

36

कोल्हापूर-कटीहार मार्गावर विशेष ट्रेन

मध्य रेल्वेने कोल्हापूर, मिरज आणि सांगली मार्गे बिहारमधील कटिहारसाठी एक विशेष ट्रेन सुरू केली आहे. ही गाडी दर रविवारी सकाळी 09:35 वाजता कोल्हापूरहून सुटेल, आणि मंगळवारी सकाळी 06:10 वाजता कटिहारला पोहोचेल. याच गाडीच्या परत फेरीची वेळ मंगळवारी संध्याकाळी 06:10 वाजता कटिहारहून सुटून गुरुवारी दुपारी 03:35 वाजता कोल्हापुरात पोहोचेल.

46

कोल्हापूर-मुंबई मार्गावर साप्ताहिक ट्रेन

दुसरी विशेष ट्रेन कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणार आहे, जी साप्ताहिक असेल. ही ट्रेन दर बुधवारी रात्री 10:00 वाजता कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 01:30 वाजता मुंबईत पोहोचेल. मुंबईहून ही ट्रेन दर गुरुवारी दुपारी 02:30 वाजता सुटून, शुक्रवारी पहाटे 04:20 वाजता कोल्हापुरात दाखल होईल.

56

कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर विशेष सेवा

तिसरी विशेष ट्रेन कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर धावणार आहे, जी शुक्रवार वगळता आठवड्यातील इतर दिवस चालवली जाईल. कोल्हापूरातून सकाळी 06:10 वाजता सुटणारी ही ट्रेन दुपारी 04:10 वाजता कलबुर्गी पोहोचेल. सायंकाळी 06:10 वाजता कलबुर्गीतून सुटणारी ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 05:40 वाजता कोल्हापुरात पोहोचेल.

66

सणासुदीच्या काळात रेल्वे सेवेचा विस्तार

शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी आणि छटपूजा यांसारख्या मोठ्या सणांच्या काळात अनेक लोक आपल्या मूळ गावी जात असतात, आणि त्यात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. यामुळे तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येचा विचार करून, पश्चिम रेल्वेने देखील चार विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories