कार्तिकी एकादशी यात्रेच्या काळात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर श्रींचा पलंग काढला जाईल. त्यामुळे या काळात काकड आरती, धूपारती, पोशाख, शेजारती आणि राजोपचार बंद राहतील. मात्र, नित्यपूजा, गंधाक्षता आणि महानैवेद्य हे राजोपचार नेहमीप्रमाणेच पार पाडले जातील.
मंदिर समितीच्या माहितीनुसार, या काळात भक्तांना २४ तास मुखदर्शन आणि २२ तास १५ मिनिटे पदस्पर्शदर्शन घेता येईल. दर्शन रांगेत होणारी गर्दी लक्षात घेऊन रांगेचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सुरक्षा व्यवस्था यावर विशेष भर दिला आहे.