राज्य सरकारकडून दिलेली माहिती आणि हायकोर्टाचे प्रश्न
राज्य सरकारने कोर्टात सांगितले की, गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे. तरीही आम्ही समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहोत. शनिवार आणि रविवारसाठी आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असून, केवळ 5,000 लोकांपुरतीच मर्यादित परवानगी देण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारने दिलेल्या परवानगीवर आक्षेप घेतल्यानंतर, कोर्टाने विचारलं, "अर्जावर जरांगे पाटील यांची खरोखर सही आहे का?" यानंतर जरांगे पाटील यांचा अर्ज वाचण्यात आला. अर्जात 'आमरण उपोषण' असा स्पष्ट उल्लेख होता, जो नियमबाह्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं.