हायकोर्टाच्या महत्त्वपूर्ण सूचना काय आहेत?
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
"प्रथमदर्शनी, आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीच्या अटींचे उल्लंघन झालेले दिसते. मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार यांच्यासह इतर आंदोलकांकडे सध्या कोणतीही वैध परवानगी नाही."
"26 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाचा भंग झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक सभा आणि आंदोलनाच्या नियमांनुसार सरकारने योग्य ती कारवाई करावी."
"मुंबई शहर ठप्प होऊ नये, विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत राहावे यासाठी हे आदेश जारी करत आहोत."
"उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता संपूर्ण दक्षिण मुंबई रिकामी करा."
“राज्य सरकार आणि पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी की, आणखी आंदोलक मुंबईत येणार नाहीत.”