रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पावसाळ्यात हंगामी फळे जसे की जांभूळ, पेरू, सीताफळ, आवळा यांचा समावेश करावा. आवळा आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.हिरव्या पालेभाज्या उकडून किंवा वाफवून खाव्यात, कारण पावसाळ्यात यामध्ये माती व जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. लसूण, आलं, हळद, तुळस, काळी मिरी यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते.