आपल्यासोबत असं अनेकदा होतं. आपण सफरचंद किंवा केळं कापतो आणि काही मिनिटांतच ते काळं पडायला लागतं. यामुळे फळांची चव आणि ताजेपणा दोन्ही नाहीसा होतो. पण जर ही फळं तासंतास ताजी ठेवता आली तर? यासाठीच आम्ही काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत.
उन्हाळ्यात थंडगार, ताजी फळं खाण्याची मजाच वेगळी असते. पण सफरचंद, केळी किंवा पेरू यांसारखी फळं कापल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा रंग बदलू लागतो. ती काळी पडल्यामुळे त्यांचा ताजेपणा निघून जातो आणि मग अनेकांना ती खावीशी वाटत नाहीत. तुम्हीही या समस्येला कंटाळला असाल, तर स्वयंपाकघरातील एक सोपा पदार्थ तुमच्या मदतीला येऊ शकतो.
26
फळं कापल्यानंतर रंग का बदलतो?
जेव्हा आपण फळ कापतो, तेव्हा त्याचा आतील भाग हवेच्या संपर्कात येतो. यामुळे 'ऑक्सिडेशन' (Oxidation) नावाची प्रक्रिया सुरू होते. सफरचंद, केळी आणि पेअर यांसारखी फळं काळी किंवा तपकिरी पडण्यामागे हेच मुख्य कारण आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, योग्य उपाय करून तुम्ही ती सहज टाळू शकता.
36
फळं काळी पडू नयेत म्हणून खास टिप्स
कापलेली फळं ताजी ठेवण्यासाठी, एका भांड्यात थोडं थंड पाणी घ्या. त्यात एक ते दोन चमचे लिंबाचा रस आणि थोडी साखर घाला. आता या मिश्रणात कापलेल्या फळांचे तुकडे २ ते ३ मिनिटं भिजवून ठेवा. त्यानंतर ते बाहेर काढा. आता ही फळं खाण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी तयार आहेत!
लिंबाच्या रसातील 'व्हिटॅमिन सी' ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. यामुळे फळं लवकर काळी पडत नाहीत. साखर चवीचा समतोल साधते आणि फळांचा नैसर्गिक गोडवा टिकवून ठेवते. या सोप्या मिश्रणामुळे तुमची फळं जास्त काळ ताजी दिसतात.
56
कोणत्या फळांसाठी या टिप्स उपयुक्त?
ही पद्धत सफरचंद, केळी, पेअर आणि ॲव्होकॅडो यांसारख्या फळांवर विशेषतः प्रभावी ठरते. या फळांचा रंग खूप लवकर बदलतो, त्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप उपयुक्त आहे.
66
या गोष्टी देखील ठेवा लक्षात
कापलेली फळं जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका. सुरक्षिततेसाठी ती नेहमी हवाबंद डब्यात (airtight container) ठेवा. जर तुम्ही ती लगेच खाणार नसाल, तर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे ती आणखी जास्त काळ ताजी राहतील. चला तर मग, आजच ही सोपी किचन ट्रिक वापरून बघा!