
Bhalchandra Chaturthi Vrat 2026: चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी खूप खास मानली जाते. या तिथीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. या दिवशी गणपतीच्या भालचंद्र रूपाची पूजा केली जाते, म्हणजेच ज्या रूपात गणपतीच्या मस्तकावर चंद्र असतो. यावर्षी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत ६ मार्च, शुक्रवारी पाळलं जाणार आहे. अनेक धर्मग्रंथांमध्ये या चतुर्थीचं महत्त्व सांगितलेलं आहे. चला तर मग, भालचंद्र संकष्टी चतुर्थीची तारीख, पूजा करण्याची पद्धत, शुभ योग आणि मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
भालचंद्र संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ
चतुर्थीच्या व्रतामध्ये गणपतीसोबत चंद्राचीही पूजा केली जाते. ६ मार्च, शुक्रवारी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयापूर्वी गणपतीची पूजा करून घ्या आणि चंद्र उगवल्यावर त्याला जल अर्पण करून त्याचीही पूजा करा. ६ मार्च रोजी चंद्रोदय रात्री साधारणपणे ०९ वाजून १५ मिनिटांनी होईल.
- ६ मार्च, शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करा आणि व्रत व पूजेचा संकल्प करा. दिवसभर व्रताचे नियम पाळा.
- चंद्रोदयापूर्वी शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा करा. यासाठी घरात एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करा.
- गणपतीच्या मूर्तीला कुंकवाचा टिळा लावा, फुलांची माळ घाला आणि तुपाचा दिवा लावा.
- त्यानंतर एक-एक करून जानवं, अबीर, गुलाल, शेंदूर, दुर्वा, अक्षता, वस्त्र, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करा.
- पूजा करताना 'ऊं गं गणपतये नम:' या मंत्राचा मनातल्या मनात जप करत राहा. देवाला तुमच्या इच्छेनुसार नैवेद्य दाखवा.
- पूजा झाल्यावर देवाची आरती करा. रात्री चंद्र उगवल्यावर त्याला जल अर्पण करा आणि फुलं-अक्षता वाहा.
- त्यानंतर स्वतः भोजन करा. अशा प्रकारे भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख-समृद्धी आणि शांती नांदते.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची। कंठीं झळके माळ मुक्ताफळांची । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनः कामना पुरती ॥ ध्रु. ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा। हिरेजडित मुगुट शोभतो बरा। रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥ जय. ॥ २ ॥ लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावें, निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना । जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन. ॥ ३ ॥
(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती धर्मग्रंथ, विद्वान आणि ज्योतिष्यांच्या मतांवर आधारित आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे. वाचकांनी याकडे केवळ एक माहिती म्हणून पाहावं.)