मुंबईत ट्रॅफिक जामवर महिलेचा संताप, गिरिश महाजनांसमोर आक्रोश

मुंबईत ट्रॅफिक जामवर महिलेचा संताप, गिरिश महाजनांसमोर आक्रोश

Published : Apr 22, 2026, 01:03 PM IST

मुंबईत भाजपच्या जन आक्रोश मोर्चादरम्यान मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि याच वेळी एका महिलेचा संताप अनावर झाला. कॅबिनेट मंत्री Girish Mahajan यांच्या समोरच तिने थेट प्रश्न उपस्थित करत मोर्चा रस्त्यावर न काढण्याची मागणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, विरोधकांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. आंदोलनाचा हक्क आणि सामान्य नागरिकांची गैरसोय यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.