
मुंबईत AIMIM नेते वारिस पठाण यांनी महाराष्ट्रातील नवरात्री उत्सवासाठी VHPने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांवर भाष्य केले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय दत्त यांच्या मराठीसंदर्भातील वक्तव्यावरही पठाण यांनी आपले मत मांडले. यासोबतच पालघरमधील हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरही वारिस पठाण यांनी भाष्य केले.