
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा आरोप करत त्यांनी याला निवडणूक भ्रष्टाचार म्हटले. याशिवाय पुण्यातील वाढता गुन्हेगारी दर, पाणी, कचरा आणि वाहतूक समस्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.