सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील जलजीवन मिशनची रखडलेली कामे, स्मार्ट मीटरबाबत वाढती नाराजी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून केवळ तारखा दिल्या जात असून ठोस निर्णय होत नसल्याची टीका त्यांनी केली. Missing Link प्रकल्पाच्या पहिल्याच पावसात झालेल्या समस्यांवर स्वतंत्र चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना जबाबदार धरण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर सखोल चौकशीची मागणी करत सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळले.