
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या मुद्द्यावरून BJP सरकारवर जोरदार टीका केली. झोपडपट्टी पाडकाम, पुनर्वसन, अतिक्रमण कारवाई आणि राजकीय दुटप्पीपणावर सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. तसेच पश्चिम बंगालमधील राजकारण, Humayun Kabir यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आणि विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं.