मुंबईत माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ईडीने तृणमूल काँग्रेसच्या निधीवर केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. टीएमसीच्या निधीची चौकशी होत असेल तर भाजपला मिळालेल्या निधीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी इलेक्टोरल बाँड्स, राम मंदिर ट्रस्टच्या पावत्या आणि निधीबाबतही प्रश्न उपस्थित केले. तसेच मिसिंग लिंक प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक पैशांचा गैरवापर झाल्याचा दावा केला. या मुद्द्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.