
तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचा उल्लेख करत जनतेचा कल बदलत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढल्याचेही ते म्हणाले. जंतर-मंतर आंदोलन, राम मंदिर देणगी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई यांसारख्या मुद्द्यांचाही मतदारांवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. मोहन भागवत यांच्या झेन-झी संवाद कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली. शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयीन सुनावणी, न्यायव्यवस्थेतील प्रलंबित घटनात्मक खटले तसेच सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रावरही त्यांनी भूमिका मांडली.