राहुल गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज केला दाखल, किशोरीलाल शर्मा यांनी 'या' ,मतदारसंघातून भरला अर्ज

राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असून अमेठीमधून गांधी कुटुंबाचे एकनिष्ठ किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

vivek panmand | Published : May 3, 2024 8:56 AM IST / Updated: May 03 2024, 02:29 PM IST

काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा जागेसाठी लवकरच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधींसोबत आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी होत्या. 3 मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 20 मे रोजी मतदान होत आहे.

किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीमधून उमेदवारी केली दाखल - 
अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या नामांकनाच्या रोड शोमध्ये थोडक्यात हजेरी लावली. यानंतर त्या रायबरेलीला गेल्या. अमेठीमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या, “किशोरी जी अमेठीतील गावे, रस्ते आणि कार्यकर्त्यांना चांगल्याप्रकारे ओळखतात. त्यांना इथल्या समस्याही चांगल्याप्रकारे समजतात. गेली 40 वर्षे त्या तुमची सेवा करत आहेत. त्यामुळेच माझा विश्वास आहे की सर्व तुम्ही आमच्यात सामील व्हाल आणि किशोरीजींना विजयी कराल.”

किशोरीलाला शर्मा काय म्हणाले? - 
उमेदवारी दाखल केल्यानंतर किशोरीलाल शर्मा म्हणाले, “कोणाचा पराभव होणार आणि कोणाला विजयी करायचे हे जनतेच्या हातात आहे. आम्ही कठोर परिश्रम करू. आमची संघटना येथे आधीच कार्यरत आहे. त्या बळावर आम्ही निवडणूक लढवू. आणि जनतेच्या बळावर लढणार आहोत. जनतेने पाहिलेल्या कामाबद्दल आधीच ठरवले आहे. आम्ही 40 वर्षांपासून इथे काम करत आहोत.”
आणखी वाचा - 
Israel Hamas Conflict : अमेरिकेतील विद्यापीठ-महाविद्यालयांमध्ये तीव्र आंदोलन, कोलंबियात 2 हजार विद्यार्थ्यांना अटक
Mass Stabbing In London : "हातात तलवार घेऊन......" लंडनमध्ये माथेफिरूची दहशत ; दोन पोलिसांसह अनेक जण जखमी

Share this article