
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांनी LPG गॅस टंचाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा परिसरात सिलेंडरचे पोस्टर घेऊन काँग्रेसने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पटोले म्हणाले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या धोरणांमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. मुंबईसारख्या शहरात अनेक हॉटेल्स गॅसअभावी बंद पडत आहेत, तर विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्येही स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने त्यांना गावाकडे परत जावे लागत आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या ब्लॅक मार्केटिंगचाही आरोप पटोले यांनी केला. काही ठिकाणी सिलेंडर दोन हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच देशातील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी संसदेत येऊन जनतेला विश्वास द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यभर काँग्रेसकडून या मुद्द्यावर आंदोलन सुरू करण्यात आल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.