
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री असताना पेपरफुटीच्या घटनांवर उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा का दिला नाही, असा सवाल त्यांनी केला. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर सरकारने तातडीने कारवाई केल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही निशाणा साधला. राम मंदिर, हिंदुत्व, विविध विधेयके आणि राजकीय भूमिकांवरूनही उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली.