
हेट स्पीच, नक्षलवाद, भारत-अमेरिका करार, वेस्ट एशियातील संघर्ष आणि भारतीय नागरिकांची सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. वक्तव्य स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि समाजात तणाव निर्माण करणाऱ्या विधानांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नक्षलवादाच्या मुद्द्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासोबतच शेतकरी, आंतरराष्ट्रीय करार, केरळ आणि बंगालमधील राजकारण, तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.