
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत पडताळणीनंतर तब्बल 69 लाख महिलांची नावे वगळल्याचा दावा समोर आल्यानंतर राजकारण तापलं आहे. योजनेतील गैरप्रकार, अपात्र लाभार्थी आणि सरकारी कारवाईवर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. या मुद्द्यावर माजी खासदार मजीद मेमन यांनीही प्रतिक्रिया देत सरकारवर सवाल उपस्थित केले.