
बांद्रा परिसरातील पाडकाम मोहिमेच्या सहाव्या दिवशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट देत मोठं वक्तव्य केलं. “रेल्वे टर्मिनससाठीची जागा मोकळी झाली असून vote jihad आणि land mafia यांच्यावर कारवाई सुरूच राहील,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही निशाणा साधला. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर BMC guidelines पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं.