
बारामतीत पहिल्यांदाच जनता दरबार घेतलेल्या जय पवारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दादांसारखंच काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जय पवार यांनी सांगितलं. बारामतीतील पाणी, रस्ते, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केलं. राज्यसभेच्या चर्चांवरही जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली.