इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रावर परिणाम? आदित्य ठाकरे यांची PM-CM कडून स्पष्टीकरणाची मागणी

Published : Mar 10, 2026, 08:06 PM IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरून केंद्र आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. इराण-इस्रायल युद्ध आणि पश्चिम आशियातील तणावामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती बिघडत असल्याने, त्याचा परिणाम भारतावर आणि विशेषतः महाराष्ट्रावर होऊ शकतो, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या मते, या संघर्षामुळे कच्चा माल, उत्पादनांची आयात आणि LPG गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई वाढू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देश आणि राज्यातील जनतेला या परिस्थितीबद्दल स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली. तसेच, सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा केली तरच देश पुढे जाऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

09:42हेट स्पीच ते नक्षलवाद, माजिद मेमन यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
07:51नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल
02:25गॅस सिलेंडर लेटर वादावर मंगळ प्रभात लोढा यांचे स्पष्टीकरण, सर्व धर्मांसाठी मदत केल्याचा दावा
02:53लोकसभेत नक्षलवादावर अमित शाह यांचा दावा, काँग्रेसकडून अतुल लोंढे पाटील यांचा जोरदार पलटवार
03:58चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; मुलींचं शिक्षण पूर्णपणे मोफत, इंधन तुटवड्यावरही स्पष्ट भूमिका
06:01अण्णा बनसोडे यांचे मोठे वक्तव्य; पुतळा प्रकल्प, वाढते दर आणि निधीवर स्पष्ट भूमिका
03:23ऑटो संपावर संजय शिरसाटांचा इशारा; पेट्रोल पंपांवर कारवाईचा इशारा!
01:50संजय राऊतांचा BJP वर घणाघात; “१० वर्षांत काय केलं?” थेट सवाल!
07:14मजीद मेमन यांचा BJP, अमित शाह आणि ममता बॅनर्जीवर निशाणा; राष्ट्रीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका!
01:50नितेश राणे यांचा हिंदुत्वावर थेट सवाल; राम नवमी vs ईद दुहेरी निकषांवर निशाणा!