नाशिकमध्ये संत समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वाची माहिती दिली. गोदावरी नदी स्वच्छ आणि अविरल करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये १२ महिने पाणी वाहत राहील यासाठी विशेष योजना राबवली जात आहे. कुंभमेळा हा सरकारचा नाही तर साधू-संतांचा असल्याचं सांगत त्यांनी संतांच्या मार्गदर्शनानुसार काम केलं जाईल, असंही स्पष्ट केलं. याशिवाय काही गंभीर प्रकरणांमध्ये दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.