देशातील ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक राज्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जसा विश्वास देशातील जनतेने दाखवला आहे, तसाच विश्वास इतर राज्यांमध्येही दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.